manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Saturday, August 8, 2020

9 ऑगस्ट क्रांती दिन


      9 ऑगस्ट हा भारतभरात क्रांति दिन म्हणून साजरा केला जातो, पण त्याचा इतिहास नक्की आहे तरी काय? असे काय कारण होते की 9 ऑगस्ट हा दिवस चर्चेत आला? त्यात क्रांतिकारकांचे, राष्ट्रपिता महात्मा गांधीचे नक्की काय कार्य होते? असे अनेक प्रश्न या क्रांतिदिनी पडतात. हा एक असा दिवस आहे ज्याने ब्रिटीशांना भारत सोडण्यासाठी भाग पडले, असा हा दिवस नक्की आहे तरी काय?


ऑगस्ट क्रांतीचा नारा 'भारत छोडो'-


या क्रांतीचा नारा होता, 'भारत छोडो'. आणि या एका वाक्याने अशी काही जादू केली की सारा भारत रस्त्यावर उतरला. एक क्षण असे वाटले होते की आता कोणत्याही परिस्थितीत लगेच ब्रिटिश भारत सोडून जातील.


हा काळ होता 1942 सालचा, सार जग टांगणीला लागला होते कारण जगात एक महाभयंकर घटना घडत होती. 'दुसरे महायुद्ध.,' या महायुद्धात सतत होत असलेल्या मित्र राष्ट्रांच्या पराभवामुळे ब्रिटिश हैराण झाले होते. आणि नेमक त्याच वेळी भारत ऑगस्ट क्रांतिने 'छोडो भारत'चा नारा देत पेटून उठला होता. ब्रिटीशांसाठी ही वेळ एकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती.

               या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपान आता भारतावर आक्रमण करेल याची शक्यता वाढत चालली होती, कारण जपान आता प्रशांत महासागर ओलांडून ब्रम्हदेशापर्यंत (म्यानमार) येऊन पोहचला होता. ब्रिटीशांना आता भारतीयांच्या मदतीची गरज होती. त्यांना आता भीती वाटायला लागली होती की जपान आता भारतावर हल्ला करणार. त्यामुळे ब्रिटीशांनी भारतीयांची मदत मिळवण्यासाठी भारतात असा प्रचार करण्यास सुरुवात केली की, 'भारतीय स्वतः आपल्या देशाचे मालक आहेत आणि आपल्या देशाचे संरक्षण त्यांनीच केले पाहिजे, कारण भारतावर जपानच्या हल्ल्याचा भीती वाढत आहे.'


ब्रिटीशांच्या प्रचारला विरोध करीत गांधीजींनी असे मत मांडले की, "ब्रिटिश भारतात असल्याने जपान भारतावर आक्रमण करीत आहे, म्हणून ब्रिटीशांनी भारत सोडून जावे आणि भारतीयांच्या हाती सत्ता सोपवावी. जर ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली तरच भारत ब्रिटीशांना युद्धात मदत करेल."


फोडा आणि राज्य करा ही नीती धोरणे रखणारे ब्रिटिश हे ऐकण्यास तयार नव्हते, ब्रिटीशांनी याला नकार दिल्याने भारत छोडो अशी धमकी देत भारतीय आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरच उतरले. अनेक कॉंग्रेसच्या नेत्याचे मत होते की जपान युद्धासाठी आवासून असताना आंदोलन करण्याची ही योग्य वेळ नव्हती. यावर निर्णय घेण्यासाठी 1942 ला वर्ध्यात कॉंग्रेस ची बैठक घेण्यात आली आणि त्यात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या पुढाकाराने 'अहिंसा विधरोह' हा कार्यक्रम पारित करण्यात आला.


8 ऑगस्ट 1942 ला मुंबई मध्ये अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस महासमितीची बैठक घेऊन भारत छोडो चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.


'संप्रदायिकताची छाप असेल तर तुम्ही या संघर्षापासून लांब राहिले पाहिजे.'


7 आणि 8 ऑगस्ट ला जेव्हा प्रस्तावावर चर्चा झाली तेव्हा गांधीजी म्हणाले की, "स्वतंत्र मिळाले की आपले काम संपणार नाही, आपल्याला कोणीही हुकूमशहा नको, आपले ध्येय स्वतंत्र मिळवणं आहे, आणि त्यानंतर जो कोणी शासन सांभाळू शकत असेल त्यांनी ते सांभाळावे. शक्यता आहे की तुम्ही निर्णय घ्याल की सत्ता पारसीयांकडे सोपवण्याचा, परंतु तुम्ही हे म्हणू नका की सत्ता पारसींकडे का सोपवावी. शक्यता आहे की सत्ता त्यांना सोपवली जाईल ज्यांचे नाव कॉंग्रेस मध्ये कधी घेतलेही नसू शकेल. हा निर्णय घेण्याचे काम लोकांचे आहे. तुम्ही हा नाही विचार केला पाहिजे की संघर्ष करताना अधिक संख्या हिंदूची होती, मुस्लिम आणि परसींची कमी होती, आणि जर तुमच्या मनात तीळमात्र देखील संप्रदायिकताची छाप असेल तर तुम्ही या संघर्षापासून लांब राहिले पाहिजे."


. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांची धाबे दणाणले.


देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री बातमी मिळाल्याने पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. आता प्रत्येकजण पुढारी होईल, असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. मात्र ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वा-याच्या वेगाने पसरली. गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली.


नेत्यांची धरपकड झाल्याने शांत होईल, अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती. मात्र घडले भलतेच. नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने जमावबंदी लागू केली. पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते. पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. संपूर्ण देश पेटून उठला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. ब्रिटिशांकडून दडपशाही सुरू होती. पाहिजे त्याला विनाचौकशी अटक केली जात होती. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता.


         याच दरम्यान कस्तुरबा गांधी आजाराने मरण पावल्या, तर गांधीजी मलेरियाने आजारी होते. याकारणाने लोक अजूनच चिडून उठले, त्यांनी गांधीजीची सुटका करावी अशी मागणी केली, वातावरण आणखी चिघळेल या भीती ब्रिटिशांनी गांधीजींची आणि त्यांच्या सहकार्‍यांची सुटका केली.


भारत छोडो आंदोलनात 940 पेक्षा जास्त आंदोलनकारी मारल्या गेले, 1600 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. तर 60 हजार पेक्षा जास्त आंदोकारांना अटक करण्यात आली.




Monday, August 3, 2020

10वी इतिहास व राज्यशास्त्र चाचणी

* 10वी इतिहास  व राज्यशास्त्र चाचणी*

📕 टेस्ट सोडवण्यासाठी खालील link वर टिचकी मारा आणि सर्व माहिती भरा.

📗 खालील लिंकवर डायरेक्ट जाऊन थेट चाचणी सोडवू शकता. 

📘 चाचणी सोडवल्यावर प्रश्ननिहाय गुणदान व निकाल लगेच मिळेल.

🟦  चाचणी सबमिट केल्यावर निकाल पाहण्यासाठी view score वर क्लीक करा.

📙 उत्तर चुकल्यास,बरोबर उत्तरे देखील  मिळतील.👇🏻

10 वी इतिहास धडा 1 इतिहास लेखन:पाश्चात्य परंपरा   चाचणी क्रमांक 1



10 इतिहास धडा इतिहास लेखन:पाश्चात्य परंपरा 1 चाचणी क्रमांक 2



10 वी इतिहास प्रकरण 2 इतिहास लेखन: भारतीय परंपरा   चाचणी 1


10 वी इतिहास प्रकरण 2  इतिहास लेखन: भारतीय परंपरा चाचणी 2


10 वी प्रकरण 3 उपयोजित इतिहास चाचणी 1 

इयत्ता १० वी इतिहास धडा ४ भारतीय कलांचा इतिहास


इयत्ता १० वी इतिहास धडा ५ प्रसारमाध्यमे आणि इतिहास

 10वी प्रकरण 7 खेळ आणि इतिहास चाचणी


10 वी राज्यशास्त्र धडा 1 संविधानाची वाटचाल चाचणी 1


10 वी राज्यशास्त्र प्र.2 निवडणूक प्रक्रिया चाचणी 1

९ वी इतिहास प्रकरण २ भारत :१९६० नंतरच्या घडामोडी चाचणी १

क्रांतिसिंह नाना पाटील


  क्रांतिसिंह नाना पाटील 
(ऑगस्ट ३इ.स. १९०० - डिसेंबर ६इ.स. १९७६


जन्म:ऑगस्ट ३इ.स. १९००
येडेमच्छिद्र तालुका वाळवा जि.सांगली पुणे सांगलीमहाराष्ट्रभारत
मृत्यू:डिसेंबर ६इ.स. १९७६ वाळवा येथे
वाळवा
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढासंयुक्त महाराष्ट्र चळवळ
धर्म:हिंदू
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.




नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. [१]

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.



  

     १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.


ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.
यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
            स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.

        स्वातंत्र्योत्तर काळ         




देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.