manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Tuesday, June 30, 2020

संत ज्ञानेश्वर


                          संत ज्ञानेश्वर



 (जन्म : आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५; मृत्यू/समाधी : आळंदी, इ.स. १२९६)
ज्ञानेश्वर मूळ नाव : ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
समाधी मंदिर:  आळंदी संप्रदायनाथ
संप्रदाय : वारकरी, वैष्णव संप्रदाय
गुरू : निवृत्तिनाथ
साहित्य रचना : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग भक्ति कविता
वडील : विठ्ठलपंत कुलकर्णी
आई : रुक्मिणीबाई
ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठल सुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानेश्वर
हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत  आणि  कवी.  भागवत   संप्रदायाचे प्रवर्तक,  योगी व  तत्त्वज्ञ होते.  भावार्थदीपिका  (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.

ज्ञानेश्वरांचे बालपण
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
     आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठणजवळ  गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. 
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली.
भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
     

ज्ञानेश्वरांचे कार्य
संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.
निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.रेरे
चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
        

संजीवन समाधी

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ
*अमृतानुभव
*चागदेव पासष्टी
*भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी- या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो.
*स्फुटकाव्ये (अभंग, विराण्याआदि.)
*हरिपाठ (श्री ज्ञानदेव हरिपाठ)
*ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरांवरील आणि ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांवरील पुस्तके
*अमृतानुभव (रा.ब. रानडे)
*अमृतानुभव (पंडित सातवळेकर)
*अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
*अमृताचा अनुभव : ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद (हेमंत राजाराम)
*आजची ज्ञानेश्वरी - मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद - त्र्यंबक मगनराव चव्हाण)
*संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
*संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव - (विंदा करंदीकर)
*अलौकिकतावाद ज्ञानेश्वरांचा (लेखिका : डॉ. श्यामला मुजुमदार) - ढवळे प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
*The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
*इंद्रायणीकाठी (कादंबरी, रवींद्र भट)
*गीतादर्शन : श्री ज्ञानेश्वर आणि श्री रमण महर्षी (डॉ. सुधाकर नायगावकर)
The Genius of Dnyaneshvar (रविन थत्ते)
*ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
*दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
*नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर (डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर)
*ज्ञानदेवांचे पसायदान (अरविंद मंगरूळकर, व विनायक मोरेश्वर केळकर)
*भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.शं.वा. दांडेकर)
*महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. शं.दा. पेंडसे)
*माऊलीचा सार्थ हरिपाठ (वामन देशपांडे)
*माणूस नावाचे जगणे (रविन लक्ष्मण थत्ते)
*मी हिंदू झालो (रविन थत्ते)
*मुलांसाठी संत ज्ञानेश्वर (वामन देशपांडे)
*येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - *प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
*विश्व माऊली ज्ञानेश्वर (डॉ. शैलजा काळे)
*श्रीज्ञानेश्वर - अलौकिक व्यक्तिमत्त्व (कोंकणी, हरदत्त खांडेपारकर)
*संजीवन (ज्ञानेश्वरांच्या भावविश्वावरील कादंबरी, लेखक - भा.द. खेर)
*संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे)
*संत ज्ञानेश्वर (बालवाङ्मय, ल.गो. परांजपे)
*संत ज्ञानेश्वर महाराज (चरित्र, बालवाङ्मय, लेखक - अरुण गोखले)
*संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी' (शंकर अभ्यंकर)
*सार्थ श्री ज्ञानेश्वरी (श्री गुरु साखरे सांप्रदायिक शुद्ध) (संपादक - विनायक नारायण जोशी आणि रामचंद्र तुकाराम यादव; अक्षर दालन प्रकाशन)
*सार्थ श्रीज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास)
*ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
*श्री ज्ञानदेव गाथा (साखरे महाराज)
*श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ, प्रा. के.वि. बेलसरे)
*ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
*ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
*श्रीज्ञानदेव विजय (मामा देशपांडे, रा.नी. कवीश्वर)
*ज्ञानराज माउली (लीला गोळे)
(वि)ज्ञानेश्वरी (रविन थत्ते, मृणालिनी चितळे)
*ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी (विनोबा भावे)
*ज्ञानदेवांची वाणी (डॉ. अशोक देशमाने, डॉ. विद्यासागर पाटंगणकर)
*ज्ञानदेवांचे निवडक अभंग ((डॉ. प्रमोद पडवळ)
*श्रीज्ञानेश्वर चरित्र (ल.रा. पांगारकर)
*श्रीज्ञानेश्वर : तत्त्वज्ञ, संत आणि कवी (व्याख्यानसंग्रह, *व्याख्याते लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - ढवळे प्रकाशन
*ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. श्रीपाल सबनीस)