manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Friday, February 26, 2021

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद

 ********************************

*- क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद *

********************************




जन्म - २३ जुलै १९०६ (मध्यप्रदेश)

मृत्यू - २७ फेब्रुवारी १९३१ (अलाहाबाद)


ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात मात्र विलीन झाले.


आपल्या भारतावर सुमारे १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते. स्वराज्य मिळावे यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अनेकांनी अनेक विविध मार्ग अवलंबिले. अनेक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी कसे लढले याचे धडे आपल्याला लहानपणापासूनच दिले जातात. त्यांच्याशी निगडित अनेक किस्से, गोष्टी आपण ऐकत असतो.


असाच एक स्वातंत्र्यवीर आपल्या भारतासाठी स्वतःचे प्राण त्यागून अजरामर झाला. व्यवस्थित भांग पाडलेले काळेभोर केस, हातावर घड्याळ, पिळदार आणि टोकेरी मिश्या आणि एका हाताने त्या मिश्याना पीळ देणारा फोटो आपण पाहिला कि आपल्या ओठांवर लगेच नाव येते आझाद ! चंद्रशेखर आझाद ! जहाल मतवादी आझाद हे आजही सर्वांना प्रेरणा देऊन जातात. आज याच आझादांच्या आझाद अशा आयुष्यावर हा लेख.


*कसे झाले तिवारी ते आझाद ?*


२३ जुलै १९०६ मध्ये, मध्य प्रदेश मधील भाबरा या गावात सीताराम तिवारी आणि जागरानी देवी तिवारी यांच्या पोटी मुलगा जन्माला आला, मुलाचे नाव ठेवले चंद्रशेखर. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार आणि मल्लखांब सारख्या खेळांत प्रवीण होते. या छोट्याश्या गावात चंद्रशेखर यांना स्वतःचे अस्तित्व सापडत नव्हते. वयाच्या १३/१४ व्या वर्षी आपल्या गावात येणाऱ्या एका व्यापाऱ्यासोबत चंद्रशेखर आपला रस्ता बनवत निघाले मुंबई कडे. मुंबई मध्ये आले, काही काळ जहाजावर काम देखील केले, मग संस्कृत शिक्षणासाठी ते गेले बनारस येथे.


मुंबई, बनारस यांसारखी मोठी शहरे त्या काळी स्वातंत्र्य आंदोलनाची केंद्रे होती. याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे संपूर्ण देश दुःखाच्या गर्तेत होता. या आंदोलनांची माहिती सर्वांसारखीच चंद्रशेखर या १५ वर्षाच्या मुलापर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. त्याने मात्र फक्त या बातम्या ऐकल्या नाहीत, त्याने या बातम्यांचा एक भाग होण्याचे ठरविले आणि या १५ वर्षाच्या मुलाने महात्मा गांधीजी यांनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता, पोलिसांनी अनेक मुलांना अटक केली आणि यात चंद्रशेखर यांना सुद्धा अटक केली गेली.


त्यांच्यावर कोर्टात खटला चालू झाला, याच खटल्यात त्यांना पेश करताच त्यांना नाव विचारण्यात आले, यावर ते म्हणाले, "मी चंद्रशेखर आझाद" आणि बस्स त्या दिवसापासून चंद्रशेखर तिवारी यांना सगळे चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखू लागले.


*जहाल मतवादी प्रवास*


असहकार आंदोलनातील खटल्यामध्ये शिक्षा भोगून आझाद बाहेर पडले परंतु देशासाठी आता आक्रमक वृत्तीने आपल्याला पेटून उठले पाहिजे आणि इंग्रजांना जश्यास तसे उत्तर दिले पाहिजे या विचाराने आझाद स्वस्थ बसू शकत नव्हते. गांधीजींनी लोकांच्या हिंसक पद्धतींमुळे असहकार आंदोलन स्थगित केले आणि मग आझाद यांना आपला मार्ग बदलावासा वाटला. फक्त अहिंसेने क्रांती येणार नाही तर त्याला हिंसेची सुद्धा जोड हवी म्हणून चंद्रशेखर आझाद यांनी जहाल मतवाद्यांचा मार्ग स्वीकारला आणि आझाद यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या आझादीकडे पाऊले टाकली.


या प्रवासात ते अनेकांना भेटले आणि यातूनच ते जोडले गेले हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेसोबत. ते मनापासून या संघटनेचा भाग झाले आणि संघटनेसाठी प्रचार करीत असत. या संघटना चालवायच्या म्हणजे पैसे हवेत आणि पैसे मिळवण्यासाठी आझाद या संघटनेसोबत मिळून अनेक सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकायचे. या इंग्रज सरकारने भारताला बरेच लुटले, आता वेळ होती आपण त्यांना लुटण्याची. या छोट्या मोठ्या चोऱ्या आणि लूटमार करून आझाद स्वस्थ नव्हते, त्यांच्या भक्कम शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, पडेल ते काम करायची हिम्मत आणि निर्णयक्षमता या गुणांमुळे ते लवकरच संघटनेचा एक उत्तम, विश्वासू चेहरा आणि पुढारी बनले.


*काकोरी आणि बरंच काही :*


नियमित अभ्यास, कसरत, बंदुकीसारख्या शस्त्रांचा सराव यामुळे आझाद आता अतिशय तरबेज झाले होते. अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा आता एक मोठा झटका देणे त्यांच्या मनात आले. यातूनच त्यांना युक्ती सुचली काकोरी लूटमारीची. ९ ऑगस्ट १९२५ मध्ये काकोरी येथे इंग्रजांच्या खजिन्याची मालगाडी जात असताना अचानक त्या मालगाडीवर हल्ला करून मोठी धनसंपत्ती या क्रांतिकारकांनी गोळा केली.


या घटनेने इंग्रजांना चांगलेच हादरवून सोडले. त्यांनी आरोपींवर ताबडतोब खटले चालविले आणि या काळात आझाद आपला वेष बदलून अज्ञातवासात आपले कार्य करीत होते. या आरोपींमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष बिस्मिल आणि त्यांच्यासोबत संघटनेचे अनेक महत्त्वाचे क्रांतिकारी सामील होते आणि या सर्वाना फाशीची शिक्षा सुनावली गेली.


संघटनेचा मुख्य आधार गेल्यावर संघटना विखुरली गेली. आझाद यांच्या खूप प्रयत्नांनंतरही काही झाले नाही. परंतु त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. कालांतराने त्यांची ओळख भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू अशा क्रांतिकारकांशी झाली आणि मग आझाद यांना बळ आले. त्यांनी भगत सिंग, सुखदेव आणि अजून काही साथीदारांसोबत मिळून पुन्हा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करायचे ठरविले आणि अखेर सप्टेंबर १९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोसिएलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. आता या संघटनेचे आझाद हे प्रमुख होते आणि या संघटनेमध्ये भगत सिंग आणि त्यांचे साथीदार अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावत होते.


या नंतर या संघटनेमार्फत बॉम्ब बनविणे, शस्त्रसाठा जमा करणे आणि अशी अनेक क्रांतिकारी कामे केली जात होती. अशातच भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता आझाद पुन्हा एकटे, तरीही हार न मानता त्यांनी या तिघांना सोडविण्याचे सर्व प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. तरीही आपल्या क्रांतिकारी कामांमध्ये आझाद यांनी खंड पडू दिला नाही. आता तर ते अजून आक्रमक झाले आणि १९२९ मध्ये त्यांनी चक्क दिल्ली जवळील व्हाइसरॉयची अक्खी रेल्वे गाडी बॉम्ब लावून नेस्तनाबूत केली. आता मात्र इंग्रज अजूनच दचकले आणि आझाद यांना पकडण्याचे त्यांचे प्रयत्न अजून जोरात चालू झाले. अनेक प्रयत्नांनंतरही इंग्रज आझाद यांना पकडू शकत नव्हते.


*आहे आझाद नि राहीन आझाद :*


आपल्या संघटनेची सुटत चाललेली एकता, अनेक क्रांतीकारकांना खटल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न, संघटनेसाठी धन गोळा करण्याचे विविध मार्ग या साऱ्यांचा विचार आझाद यांच्या मनात घर करून होता. त्यांचे अनेक साथीदार त्यांच्या विरुद्ध झाले होते याची देखील त्यांना खबर लागली नव्हती. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथील अल्फ्रेड उद्यानात आझाद आपला साथी सुखदेव (फाशी गेलेला सुखदेव नाही) याच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करीत होते आणि अनेक समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते.


अशातच त्यांचा एक जुना साथीदार वीरभद्र तिवारी याने त्या भागातील पोलीसांना बातमी दिली कि तुम्ही ज्या आझादला शोधून दमला आहात तोच आझाद सध्या अल्फ्रेड उद्यानात तुम्हाला सापडेल. ताबडतोब इंग्रज अधिकारी आपल्यासोबत मोठी फौज घेऊन उद्यानाकडे रवाना झाले. या प्रकारची खबर आझाद यांना मुळीच नव्हती.


अनेक विषयांवर चर्चा करत ते सुखदेव सोबत एका झाडाच्या सावलीत बसलेले होते. अचानक एकाएकी अक्खे उद्यान इंग्रजांनी काबीज केले आणि आझाद यांना शरण येण्याची आज्ञा करण्यात आली, केलेली आज्ञा धुडकावून आझाद यांनी आपली पिस्तूल काढली आणि ते इंग्रजांवर गोळीबार करू लागले. यातच इंग्रजाची गोळी थेट आझाद यांच्या मांडीवर येऊन लागली. यातनांना कुरवाळत बसायला वेळ नव्हता, सगळं कठीण होऊन बसलं होतं.


पिस्तूल छोटी, त्यात गोळ्या सुद्धा मोजक्या आणि समोर अक्खी पोलीस फौज आणि मागे अनेक जबाबदाऱ्या आणि या साऱ्याच्या पलीकडे माझ्या भारत मातेचे स्वातंत्र्य. काय करावे काही सुचेना. त्यांनी सुखदेव याला सुखरूप पळण्यास वाट दिली आणि पुढील देशकार्य चालू ठेवण्यास सांगितले.


इंग्रजांच्या गोळीबाराला आझाद उत्तर तर देत होते परंतु हळूहळू परिस्थिती बदलून गेली. आझाद एकटे आणि मोजक्या बंदुकीच्या गोळ्या. याउलट इंग्रजांची फौज आणि अमाप गोळ्या. कसा मुकाबला व्हावा ?


लढता लढता शेवटची एक गोळी शिल्लक राहिली. काय करावे ? इतरांसारखे इंग्रजांना शरण जावे आणि मग त्यांनी आज्ञा दिल्यावर फाशी जावे ? त्यांचा विजय होऊ द्यावा कि आझाद हे नाव सार्थ करावे ?


आझाद यांनी पहिल्यांदा जेव्हा पोलिसांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली होती तेव्हाच ठरविले होते कि आझादला या पुढे कोणताही पोलीस हात लावू शकणार नाही आणि कोणतेही कारागृह बंद करून ठेऊ शकणार नाही आणि इंग्रजांच्या बेड्या कधीही माझ्या हाताची कार्यक्षमता जखडु शकणार नाहीत. आपला हा निश्चय टिकविणे त्यांना जास्त योग्य वाटले. त्यांनी मन घट्ट केले, शेवटची एक गोळी पिस्तुलात टाकली. भारतमातेला आठवून तीच पिस्तूल आपल्या कपाळाला लावून त्यांनी स्वतःला संपविले.


इंग्रज आले पण आझाद नाही तर आझादांचा मृतदेह त्यांच्या हाती आला. आझाद यांनी आपले नाव सार्थ केले. ते जन्मतःच आझाद होते आणि संपूर्ण जीवन सुद्धा आझाद म्हणून जगले आणि मृत्यूलाही भेटले ते आझाद म्हणूनच. देश तर आझाद झाला परंतु असे असंख्य आझाद मृत्यूच्या पारतंत्र्यात विलीन झाले.


ते आझाद होते नि आझाद म्हणूनच राहिले !


प्रणाम ह्या भारतमातेच्या थोर पुत्राला !


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


********************************

संत रोहिदास

 

संत रोहिदास




महान संत रोहिदास यांच्या जन्माशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी पुरावे व वस्तुस्थितीच्या आधारे थोर संत रोहिदास यांचा जन्म तथ्येच्या आधारे ई. स. १३७७ च्या माघ पौर्णिमेच्या सुमारास मानला जातो. आपल्या देशात थोर संत रोहिदास यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. उत्तर भारतात संत रोहिदास यांना रविदास किंवा रैदास या नावाने देखील ओळखले जाते.




जन्मतारीख – १३७७ वा १३९८ 

जन्मस्थान – वाराणसी शहरातील गोवर्धनपूर गाव

वडील – संतोख दास (रघु)

आई – कालसा देवी

कार्य – निर्गुंत आणि समाजसुधारक, कवितांच्या माध्यमातून सामाजिक शिक्षण

मृत्यू – १५४०

संत रोहिदास यांची जीवनी

थोर संत रोहिदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील गोवर्धनपुर गावात झाला, त्यांचे वडील संतोख दास जी चपला बनवायचे काम करायचे. रोहिदास यांना लहानपणापासूनच संतांच्या प्रभावाखाली राहण्यास आवडत असत, यामुळे ते अध्यात्माची गोडी लागली. संत रोहिदास आपल्या कामावर भक्तीने विश्वास ठेवत असत, म्हणून वडिलांनी त्यांना चपला बनविण्याचा काम करण्यास सांगितले. संत रोहिदास परिश्रम घेऊन अत्यंत समर्पितपणे आपले कार्य करीत असत आणि ज्या कोणालाही मदतीची गरज भासली, तेव्हा रविदास त्यांच्या कामाची किंमत न घेता लोकांना अशी चपला बनवून देत असत.
एकदा त्याच्या गावातले सर्व लोक सणानिमित्त गंगेसनासाठी जात होते, तेव्हा सर्वांनी रोहिदास यांना गंगा स्नानासाठी जाण्याची विनंती केली पण रोहिदास यांनी त्या दिवशी गंगासनला जाण्यास नकार दिला कारण त्यांनी चपला बनवण्याचे आश्वासन दिले होते आणि मग रविदास जी म्हणाले की जर मी गंगेत स्नान करण्यास गेलो तर माझे लक्ष माझ्या प्रतिज्ञावर असेल, मग जर जर मी वचन मोडले तर मला गंगास्नानाचे आशीर्वाद कसे मिळतील. ही घटना संत रोहिदास यांच्या कर्तृत्वाशी निष्ठा आणि आज्ञाधारकपणा दाखवते. यामुळे संत रविदास जी म्हणाले की माझे मन जर स्वच्छ असेल तर माझे चपला धुवायची जागा देखील गंगा आहे.
तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली – “मन चंगा तो कठौती में गंगा”
म्हणजेच, जर आपले मन शुद्ध असेल तर देव आपल्या अंत: करणात वास करतो.

संत रोहिदास नेहमीच जातीभेदाविरूद्ध होते आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा ते नेहमीच सामाजिक कुप्रथांविरूद्ध आवाज उठवत असत, रोहिदासजींचे गुरू रामानंद जी होते, ज्यांच्या भक्तीचा प्रभाव रोहिदास यांच्यावर होता म्हणूनच संत रोहिदास यांना केंव्हाही संधी मिळाली की, ते भक्तीमध्ये मग्न होत, यामुळे त्यांना बरेच काही ऐकावे लागले आणि लग्नानंतर जेव्हा रोहिदास आपले बनवलेल्या चपला गरजू व्यक्तीस मोफत देत असतं परिणामी रोहिदास यांच्या वडिलांना घर चालविण्यासाठी कठीण होई. त्यामुळे वडिलांनी त्यांना वेगळे केले तरीदेखील त्यांनी आपला भक्तिमार्ग सोडला नाही.
त्यानंतर संत रोहिदास ही ओळ म्हणाले: –

अब कैसे छूटे राम रट लागी।प्रभु जी, तुम चंदन हम पानी, जाकी अँग-अँग बास समानी॥प्रभु जी, तुम घन बन हम मोरा, जैसे चितवत चंद चकोरा॥प्रभु जी, तुम दीपक हम बाती, जाकी जोति बरै दिन राती॥प्रभु जी, तुम मोती, हम धागा जैसे सोनहिं मिलत सोहागा॥प्रभु जी, तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ति करै ‘रैदासा’॥

म्हणजेच, रविदास जी भगवंताला आपला अविभाज्य भाग मानत असत आणि देवाशिवाय जीवनाची कल्पनाही करत नव्हते, जी आपण या ओळीत पाहतो.

संत रोहिदास हे जातीव्यवस्थेचा सर्वात मोठा विरोधक होते, त्यांचा असा विश्वास होता की मानवांनी निर्माण केलेल्या जातीवादामुळे माणूस माणसापासून दुरावला जात आहे आणि जातीने माणसात फूट पाडल्यास काय फायदा?

जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात।रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात।।

संत रोहिदास यांच्या काळात, जातीभेद शिगेला पोचला होता जेव्हा रोहीदास यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांची मदत मिळाली नाही, लोकांचा असा विश्वास होता की तो शूद्र जातीचा आहे आणि जर त्यांचे अंत्यसंस्कार जर गंगेत झाले तर गंगा देखील प्रदूषित होईल ज्यामुळे त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणी येत नाही, मग संत रोहीदास यांनी देवाला प्रार्थना केली, त्याचवेळी वादळ येऊन त्यांच्या वडिलांचे मृत शरीर त्या वादळामुळे मुळे गंगेमध्ये विलीन झाले आणि तेव्हापासून असे मानले जाते की काशीमध्ये गंगा उलट दिशेने वाहते.
संत रोहिदास यांच्या महानतेचा पुरावा आणि भक्ती भावनेच्या शक्तीचे त्याच्या जीवनातील बर्‍याच घटनांमध्ये आढळते. संत रोहिदासांच्या जीवनात अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत, ज्या आजही जातीवादाच्या भावनेच्या पलीकडे जाऊन आणि खर्‍या मार्गावर चालून समाज कल्याणचा मार्ग दाखवतात.

थोर संत गुरू रविदास यांच्या जीवनातून शिक्षण
जरी महान संत रोहीदास आज जरी आपल्या समाजात नसले तरी त्यांचे उपदेश आणि भक्तीने समाज कल्याणाचा मार्ग आपल्याला दाखवला आहे. महान संत रोहिदास यांनी आपल्या जीवनातील कृतीतून सिद्ध केले की माणसाने कोणत्या कुळात किंवा जातीत जन्म घेतला यावरून तो कधीच महान होते नाही, पण जो मानवाबद्दल आदर आणि भक्ती ठेवतो तोच कायमच महान असतो आणि लोकांच्या मनावर राज्य करतो.
  संत रोहिदासांना महाराष्ट्रात ‘रोहिदास’ म्हणतात, पण देशातील अनेक प्रांतात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ज्या उत्तर प्रदेशातील काशी जवळील मांडूर गावी त्यांचा जन्म झाला, तिथे त्यांना ‘रविदास’ नावाने ओळखले जाते. संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की, त्यांना १६ नावांनी ओळखले जाते. त्यांची स्मारके, पुतळे, त्यांच्या नावाच्या धर्मशाळा देशभर आहेत.त्यांना पूर्ण देश ओळखतो. ख-या अर्थाने ते एकमेव राष्ट्रीय संत आहेत! 

१४ व्या शतकापासून आजपर्यंत सर्व समाजाला त्यांची दखल घ्यावी लागली. यातच त्यांचे वेगळेपण व त्यांचे सामर्थ्य अधोरेखित होते. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत रोहिदासांची ४० पदे आहेत. संत रविदास हे हिंदू संत असतानाही शिखांच्या धर्मग्रंथात त्यांच्या रचनांना मानाचे स्थान मिळाले, याचाच अर्थ त्यांच्या दोह्यांमधला, पदांमधला भावार्थ हा हिंदू धमार्पुरता संकुचित नव्हता. ते मानवतावादी संत होते.  त्यामुळेच गुरुनानक हे रोहिदासांची गीतं, भजने म्हणत असल्याचे संदर्भ आढळतात.

 मन शुद्ध असेल तर कुठेही समाधान लाभते, पाणी मनाने कितीदाही अन् कोणत्याही नदीत स्रान केले तरी समाधान लाभत नाही, असा विचारच संत रविदासांचा होता.  ‘मन चंगा तो कठौती मे गंगा’ ही हींदी म्हणही संत रविदासांच्या वाणीतूनच आली आहे.  माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही त्याला गंगाजलाचे पावित्र्य दिसून येईल. चांभार हा देखील एक माणुसच आहे, त्याला हिन ठरवू नका, पवित्र किंवा निखळ मनाने पाहिले तर कुंडातही गंगा दिसू शकेल, केवळ तशी दृष्टी जोपासायला पाहिजे, या विचारधारेतून संत रविदासांच्या विचारांची व्यापकता कळून येते. 
         रविदास, रोहिदास संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. संत रविदासांच्या विचारांनी प्रेरीत होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द अनटचेबल’ हा ग्रंथ संत रविदासांच्या चरणी अर्पण केला आहे. 

  सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले. त्याशिवाय पारतंत्र्याविषयीची बंडखोरीही रविदासांच्या साहित्यातून दिसून येते. ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्यांनी लादलेल्या पारतंत्र्याविषयी रविदासांनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. जात-पात- श्रध्दा-अंधश्रद्धा नव्हे तर, एकजूट आणि धर्म आणि देशप्रेमाबाबतही संत रविदासांनी अतिशय रोकठोक विचार प्रकट केलेत. 

‘हिल,मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही, फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई’

    अर्थातच, एकजुटीला संत रविदासांच्या दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्व आहे.  देशहितासाठी आपआपसात, समाजासमाजात तेढ निर्माण होवू देवू नका असा अमुल्य संदेश देत, मतभेदामुळे समाज आणि देशाची अपरिमित हानी होत असल्याचेही त्यांच्या विचारधारेवरून दिसून येते. म्हणजेच, माणुस आणि देशाच्या हितासाठीच संत रविदासांचे उपदेश असल्याचे दिसून येते.

    गुरु रविदासांच्या विचारधारेत ‘मनुष्य’ हाच धर्माचा केंद्र बिंदू  होता. धर्म हा मानवांसाठी असून मानवांच्या सर्वांगीण कल्याणासाठीच धर्माने आपली भूमिका वठवावी, असे त्यांना अभिप्रेत होते. इतकेच नव्हे तर,  मूर्तिपूजेसारख्या कर्मकांडावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता.  मानवी मनाला सुयोग्य विचार करण्याची दिशा लावणे हेच सर्व सुखाचे उगमस्थान असल्याची धारणा रविदासांची होती.     केवळ अन्नाचा अर्थातच पोटपाण्याचा विचार न मांडता, लहान- थोर, गरिब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य यांच्यात समानता असावी, सर्वांना समान अधिकार असावेत.  कोणताही भेद नसल्यासच रविदास प्रसन्न राहू शकतील, असे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचेच संत रविदासांचे विचार आहेत. सर्व जीव एकाच मातीतून बनलेली भांडी आहेत. त्यांना बनविणाराही एकच आहे. एकाच परमात्म्याची ही सारी रूपे आहेत. इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीलाच प्रभूभक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होईल, असे ते सांगतात.

एकै माटी के सम झांडे, सबका एको सिरजनहारा

रविदास व्यापै एकों घट भीतर, सभको एकै घडै कुम्हारा 

    उपरोक्त चार ओळींतूनच संत रविदासांच्या विचारांची समाजवादी विचारांची व्यापकता कळून येते.